वंदे भारत व जनशताब्दी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; 3 मेपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार

नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

Published By Shubh Prabhat
On

रेल्वे मंडळाने गाडी क्र. 20705 व 20706 हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजूर साहिब नांदेड वंदे भारत गाडीच्या धावण्याच्या वेळेत सुमारे 30 मिनिटांची कपात करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार गाडीच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून नवीन वेळा दिनांक 3 मे 2026 पासून लागू होणार आहेत. 

गाडी क्र. 20705 (हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ही 3 मे 2026 पासून सुधारित वेळेनुसार धावेल. नांदेड येथून सुटण्याची वेळ सकाळी 05:00 ऐवजी 05:20 करण्यात आली आहे. परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी स्थानकांवरील आगमन व प्रस्थान वेळेत काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमनाची वेळ 14:25 ऐवजी 14:15 अशी सुधारित करण्यात आली आहे.

गाडी क्र. 20706 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजूर साहिब नांदेड) हीदेखील 3 मे 2026 पासून नव्या वेळेनुसार धावेल. मुंबई येथून सुटण्याची वेळ 13:10 ऐवजी 13:15 करण्यात आली आहे. मार्गातील प्रमुख स्थानकांवरील वेळेत बदल करण्यात आला असून एकूण प्रवास कालावधीत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे.

Indian_Fast

या बदलानुसार इतर काही गाड्यांच्या वेळापत्रकातही सुधारणा करण्यात आली आहे. गाडी क्र. 17663 रायचूर - परभणी ही परभणी येथे 06:40 ऐवजी 06:55 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 17688 धर्माबाद - मनमाड (मराठवाडा) ही मनमाड येथे 13 :25 ऐवजी 13:40 वाजता पोहोचेल.

तसेच गाडी क्र. 12072 हिंगोली - मुंबई जनशताब्दी गाडी हिंगोली येथून 04:20 ऐवजी 04:15 वाजता सुटेल. बसमत, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर आणि जालना स्थानकांवरीील वेळेत प्रत्येकी काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. जालना येथे आगमनाची वेळ 08:28 ऐवजी 08:23 अशी करण्यात आली आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रकाची खातरजमा करूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नवीन वेळापत्रक दिनांक 3 मे 2026 पासून प्रभावी होणार आहे. 

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज