महाराष्ट्र
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह पथक घटनास्थळी
Published On
By Shubh Prabhat
जालना : शहरातील खडकपुरा येथील एका 24 वर्षीय तरुणाचा जालना शहर महानगरपालिकेच्या जवळील रोडवर खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयूर मेंढरे (वय 24, रा. खडकपुरा, जालना) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Read More...
उशिरा घेतलेली जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या जखमांचे उत्तर कोण देणार?
Published On
By Dainik Shubh Prabhat
२५ जुलै २०२६ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा केवळ एका मंत्र्याच्या पदत्यागाची घटना नसून, गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतल्याचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे. या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.
Read More...
बेपत्ता तरुणाच्या हत्येचा वर्षभरानंतर उलगडा; आर्थिक व्यवहारातून मित्रानेच केला खून; डीएनए अहवालाने मृतदेहाची ओळख पटली
Published On
By Shubh Prabhat
जालना : तालुका पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२५ मध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तब्बल वर्षभरानंतर उलगडा झाला असून, आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून त्याच्या मित्रानेच गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुधना नदीत फेकल्याचेही समोर आले असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More...
समृद्धी महामार्ग प्रकरणाला मोठे वळण; ‘ॲपको’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना, प्रतिनिधी : जालना–नांदेड समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान कथित अवैध मुरूम उत्खनन, शासनाच्या महसुलाचे नुकसान आणि कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून कंत्राटदार ॲपको इन्फ्राटेक कंपनी व संबंधितांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More...
महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना : महिलांना एकत्र आणणे हे आव्हानात्मक काम असले, तरी त्या संघटित झाल्यानंतर समाजपरिवर्तनाची नवी क्रांती घडू शकते. महिलांनी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास घडविला असून, हाताच्या बोटांप्रमाणे वेगवेगळे असलेले विचार एकत्र आले की जशी शक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे महिला एकजूट ही समाजाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे, आणि त्यातून परिवर्तनाची नवी क्रांती घडते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
Read More...
दुर्गम गावात जिल्हाधिकाऱ्यांची घोंगडी बैठक; श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी थेट ऐकल्या ग्रामस्थांच्या समस्या
Published On
By Dainik Shubh Prabhat
ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी प्रशासकीय कामकाजाला लोकाभिमुख स्वरूप देत दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. कार्यालयातील दालनात बसून कामकाज करण्याऐवजी त्यांनी थेट गावकऱ्यांच्या दारी जाऊन घोंगडी बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read More...
शववाहिका असतानाही मृतदेहाची विटंबना; कचर्याच्या गाडीतून युवकाचा मृतदेह; प्रशासनाच्या कारभारावर संताप
Published On
By Shubh Prabhat
परतूर शहरात एका युवकाचा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणार्या वाहनातून शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार तसेच असंवेदनशील कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Read More...
अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात; ६ लाख ४० हजाराची लाच घेताना अटक
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाला हादरा देणाऱ्या कारवाईत अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मासिक हप्त्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केल्याचा आरोप असून, छत्रपती संभाजीनगर येथे ही धडक कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
Read More...
पत्नीचा गळा आवळून सदोष मनुष्यवध; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास
Published On
By Shubh Prabhat
जालना, दि. 28 : पत्नीचा रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी आरोपी गजानन हरिभाऊ कावळे (रा. भाटेपुरी, ता. जि. जालना) याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
Read More...
रोजगार हमी योजनेतील विहिरींची बिले रखडली; शेतकर्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ
Published On
By Shubh Prabhat
जालना, प्रतिनिधी : जालना तालुक्यातील ढगी, बोरगाव आणि खांबेवाडी शिवारातील अनेक शेतकर्यांची रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची बिले गेल्या अनेक महिन्यांपासून अडकवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकर्यांनी केला आहे. आर्थिक लाभ मिळत नसल्यानेच संबंधित अधिकार्यांकडून विहिरींचे मस्टर काढले जात नसल्याचा आरोप शेतकरी करत असून या प्रकारामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.
Read More...
वसतीगृह की भग्न इमारत? सामाजिक न्याय विभागाचा निष्काळजीपणा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नरकयातना; सामाजिक कार्यकर्ते आक्रमक
Published On
By Shubh Prabhat
@ShubhPrabhatTV नागेवाडी टोलनाका परिसरात चंदनझिरा पोलिसांची धाड; साडेचार लाखांची लोखंडी सळई जप्त
#breakingnews #jalna #jalnanews #jalnapolice #jalnaviralvideo #maharashtranews #marathinews #shubhprabhat #news #शुभप्रभात
Read More...
आयआरसीटीसीच्या कथित ढिसाळ नियोजनामुळे बौद्ध भाविक संतप्त; बोधगया ऐवजी इतर मंदिरांचे दर्शन घडवल्याचा आरोप
Published On
By Shubh Prabhat
रेल्वेच्या पर्यटन विभागामार्फत आयोजित धम्म यात्रेदरम्यान बौद्ध भाविकांनी आयआरसीटीसी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नियोजित स्थळांऐवजी इतर मंदिरांमध्ये नेले जात असल्याचा आरोप यात्रेकरूंनी केला आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडत न्यायाची मागणी केली आहे.
Read More...


