शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर खासदारांना बोलू दिले नाही; काँग्रेस व किसान काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

दि. 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Published By Shubh Prabhat
On

जालना तालुका काँग्रेस आणि किसान काँग्रेसच्या वतीने तहसीलदार छाया पवार यांना निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आयोजित बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आले.

तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पडुळ आणि किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. दि. 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री संजय सिरसाट अध्यक्षस्थानी होते.

बैठकीदरम्यान खासदार डॉ. कल्याण काळे हे शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडत असताना त्यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी शेतकर्‍यांसाठी संवैधानिक मार्गाने प्रत्येक बैठकीत त्यांचे प्रश्न मांडणारच, अशी ठाम भूमिका खासदार काळे यांनी व्यक्त केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Indian_Fast

यावेळी सोपान तिरुखे, गणेश खरात, भाऊसाहेब लकडे, ड. देवराज, गौतम लांडगे, डोंगरे, ज्ञानेश्वर इंगोले, राम मोरे, बबलू राजपूत, अजीम शेख, पप्पू काळे, परमेश्वर सुळसुळे, नितीन बचाटे, भरत शिंदे, राम पवार, रामनाथ देव्हडे, विक्रम चव्हाण, विजय राठोड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

प्रतिनिधी