जालन्यात काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरू; नव्या नेतृत्वाला संधी मिळणार - खा. डॉ. कल्याण काळे यांची माहिती
या अभियानांतर्गत जिल्हा पातळीपासून बूथ स्तरापर्यंत संघटनात बदल करण्यात येणार
Published By Shubh Prabhat
On
काँग्रेस पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातही संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देत पक्ष अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. आता नव्या चेहर्यांना संधी मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानांतर्गत जिल्हा पातळीपासून बूथ स्तरापर्यंत संघटनात बदल करण्यात येणार असून, दीर्घकाळ एकाच पदावर असलेल्या पदाधिकार्यांना बदलून नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पद भूषवलेल्या जिल्हाध्यक्षांच्या जागी नवीन नेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या पारदर्शक प्रक्रियेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वामुळे काँग्रेसला जिल्ह्यात नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्त्वाचे मानले जात आहे.


